कात्रज ते सिंहगड (के२एस)
kATRAJ
2 sINHAGAD
ठिकाण – कात्रज ते सिंहगड – पुणे – महाराष्ट्र – भारत
टेकड्यांची संख्या – १५ (अंदाजे)
एकूण अंतर – १६ किमी. (अंदाजे)
डोंगररांग – सह्याद्री
१५ पेक्षा जास्त टेकड्या, एकूण अंतर अंदाजे १६ किमी. शारीरिक क्षमतेची
परीक्षा, काही कमी उंचीच्या तर काही जास्त उंचीच्या टेकड्यांची रांग. हे असं वर्णन
फक्त एकाच ट्रेकचं होऊ शकतं.
या वेगळ्याच प्रकारच्या ट्रेकचं नाव आहे, जो माझा ट्रेक मोहिमेतला
अकरावा आणि दुसरा नाईट ट्रेक!
के२एस!
२०-२१ जानेवारी २०१८ शनिवार-रविवार.
खूप महिन्यांपासून मनात हा ट्रेक करायचा होता, ती संधी मिळाली. एक
नवीन ग्रुप, ‘इंडिया ट्रेक’सोबत जायचं ठरलं. ट्रेक ग्रुपला फोन करून ट्रेकचे
डीटेल्स विचारले, ट्रेकचे पैसेही लगेच भरले. २० जानेवारी शनिवारी रात्री ट्रेक
होता. ट्रेकच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पिक अप कुठे होणार ते कळलं होतं, त्याप्रमाणे
स्वारगेटला कात्रजकडे जाणाऱ्या बसेस जिथून सुटतात, तिथे भेटायचं ठरलं होतं. रात्री
८ वाजेपर्यंत मी कॅबने बस स्टँडला पोहोचले. आधी चुकून स्वारगेट बस स्टँडला गेले
आणि तिथून इंडिया ट्रेकचा लीडर सर्वेश धुमाळ याला फोन लावला. त्याला विचारलं, की
“मी स्वारगेटला पोहोचले आहे, तुम्ही कुठे उभे आहात?” तर तो म्हणाला, “आम्ही
स्वारगेट बस स्टँडला नाही, तर स्वारगेटजवळच दुसरं एक संभाजी महाराज बस स्टँड आहे,
तिकडे ये.” मग मी एका ऑटोवाल्याला “संभाजी महाराज बस स्टँड कुठे आहे” विचारलं आणि
तिथे पोहोचले. बरेच ट्रेकमेट्स तिथे पोहोचले होते. थोड्या वेळाने लीडर सर्वेश आणि
देवा आले. माझी त्यांच्याशी ओळख झाली. अर्ध्या तासाने आम्ही सगळे कात्रजकडे जाणारी
बस पकडली. पुढे अर्ध्या तासाने बस कात्रज भोगद्याजवळ (कात्रज टनेल) पोहोचली आणि
आम्ही सगळे तिथेच उतरलो, कारण आमचा ट्रेक कात्रज टनेलच्या वरूनच सुरू होणार होता. बसमधून
उतरून आम्ही सगळे टनेलजवळच थोड्या वेळ उभे राहिलो. मग इंडिया ट्रेकने आम्हाला
रात्रीचे जेवण म्हणून मेथी पराठे आणि एनर्जी ड्रिंक दिले. थोड्या वेळातच आमचा
कात्रज-सिंहगड ट्रेक सुरू झाला.
सुरुवातीलाच काही अंतर चढल्यावर आम्ही एका सपाट ठिकाणी १० मिनिट
थांबलो, लीडरने ट्रेक सूचना केल्या आणि आमचा ट्रेक सुरू झाला. मी प्रथमच असा ट्रेक
करत होते. एक टेकडी संपते न संपते, लगेच दुसरी टेकडी सुरू. १ तासाचा चढ-उतार पार
केल्यानंतर सगळ्यांना भूक लागली आणि आम्ही डिनर पॅकेट उघडले आणि जेवण केलं. मी
घरातून जेवून निघाले होते, म्हणून मला जास्त भूक नव्हती. मी थोडंच खाल्लं. वरतून
मी रात्रीचं पुणे पाहिलं. काय सुंदर दिसत होतं पुणे! अर्धा तास तिथेच बसून मग
आम्ही आमचा ट्रेक पुढे चालू केला आणि आता न थांबता सकाळपर्यंत चालत राहायचं होतं.
या कात्रज-सिंहगड वाटेवरचेच हे रात्रीचे भ्रमण. खेड शिवापूर, कोंढणपूर-कल्याणकडे जाणाऱ्या कुठल्याही बसने कात्रजच्या
बोगद्याजवळ पायउतार व्हायचे. या बोगद्याच्या डोक्यावरच्या डोंगरापासून या भटकंतीची
सुरुवात होते. यामध्ये एकंदर तेरा टेकडय़ा आम्हाला चढायच्या-उतरावयाच्या होत्या. तर
यातील चौदावी टेकडी ही प्रत्यक्ष सिंहगड डोंगर होती. या डोंगररांगेवर चढून आलो, की एकाच वेळी उत्तरेकडचे
गजबजलेले पुणे शहर आणि दक्षिणेकडचा शांत, हिरवागार खेड शिवापूर, नसरापूरकडचा भाग दिसतो. या दोन्ही भागांना जोडणारा बोगदा
आपल्याखाली, डोंगराच्या पोटातून
वाहता असतो. १८६४ साली ब्रिटिशांनी हा बोगदा तयार केला. पण तत्पूर्वीचा जुना मार्ग
या डोंगरावरून गेला होता. त्याच्या काही स्मृती इथली एक चौकीवजा इमारत आपल्या उरी
अजून साठवून आहे. तिने सांगितलेल्या जुन्या आठवणी जमल्या तर ऐकाव्यात आणि पुढच्या
प्रवासाला लागावे.
सुरुवातीलाच एक जोडशिखरे आडवी येतात. पहिल्याचे नाव ‘गोकुळ’, तर दुसऱ्याचे ‘वृंदावन’! जणू गोकुळाच्या दारातील वृंदावन! दोन्ही अगदी लागून असल्याने खरेतर एक चढायचे आणि दुसरे उतरायचे. कात्रजच्या डोंगररांगेकडे दुरून पाहिले, की ही जोडशिखरे लक्ष वेधून घेतात आणि मग त्या अंदाजानेच कुणालाही ‘कात्रजचा घाट’ दाखवत शाबासकी मिळवता येते. आज ही शिखरे पाहून-अनुभवून घ्या. कदाचित उद्या ही जोडशिखरेही दिसणार नाहीत.
वृंदावन गेले, की गाडी रुळाला लागल्यासारखी वाटते. घाटातल्या गाडय़ांचा आवाज मागे पडतो आणि पक्ष्यांचा किलबिलाट भोवताल जागवू लागतो. एवढा वेळ सिंहगडावर खिळलेली नजरही आता अन्य डोंगर, झाडी, वाटा, तळातील छोटय़ा छोटय़ा गावांकडे जाऊ लागते. या चढउतारावरून मग घसरणे-पडणेही सुरू होते.
एकामागोमाग डोंगर जातात. डावीकडची ससेवाडी, सणसवाडी, उजवीकडचा नवा घाटमार्ग, कोळीवाडी, खंडोबाचा दांड, नांदोशी मागे पडते आणि वाट एका मोठय़ा खिंडीत उतरते - सीताबाईची खिंड! जणू डोंगरातला चौफुला! इथून एक वाट डावीकडच्या आर्वी गावात, तर उजवीकडची डोणज्यात उतरते. या खिंडीत असलेल्या देवाला नमस्कार करायचा आणि पाण्याचे चार घोट घशाखाली उतरवत पुढच्या मुक्तुंग डोंगरावर चढाई करायची. हा चढ चढून वर आलो, की भणाणणाऱ्या वाऱ्याशी झटा देत एक एकुटवाणे झाड उभे
असलेले दिसते आणि मग या डोंगराला मुक्तुंग नाव ठेवणाऱ्याचे कौतुक वाटले. उत्तुंगावरचे हे मुक्त जीवन ते शिखर आणि त्यावरचे ते झाड जगत होते. त्यांचा हेवा वाटत होता. आत्तापर्यंत अर्धी वाट सरलेली असते आणि हिरव्या झाडीतील भरल्या अंगाचा सिंहगडही आता नजरेत आलेला असतो. त्याला खेटून असलेल्या चिलीमखडा ऊर्फ पोटॅटो पॉइंटही आता उठून दिसायला लागतो. या झाडीतच कधीकधी ससे, साळिंदर, भेकर आणि कोल्हय़ांच्या गाठीभेटी घडतात. काहींनी शपथेवर बिबटय़ा दिसल्याचेही सांगितले आहे.
पक्ष्यांसाठी तर हा परिसर स्वर्गीयच! छोटय़ाशा शिंजीरपासून ते धनेशपर्यंत आणि खंडय़ापासून ते मोरांपर्यंत अनेक पक्षिगण इथे सुखनैव नांदतात. सोनकी, तेरडा, चवर, कचोरा, भारंगी अशी नाना फुलेही इथे उमलतात. दर सात वर्षांनी फुलणाऱ्या कारवीचे पाय तर इथे घट्ट रोवलेले आहेत. असे हे वनसौंदर्य या वाटेवरच अनुभवता येते. तासाभराची ही जंगलवाट तुडवल्यावर आपण कल्याण-कोंढणपूरला उतरणाऱ्या रस्त्याजवळ सिंहगडच्या घाटवाटेला येऊन मिळतो.
डझनाहून अधिक डोंगर-टेकडय़ा, तेवढय़ाच खिंडी तुडवत जवळपास पाच-सहा तासांची भटकंती झालेली असते.
सुरुवातीलाच एक जोडशिखरे आडवी येतात. पहिल्याचे नाव ‘गोकुळ’, तर दुसऱ्याचे ‘वृंदावन’! जणू गोकुळाच्या दारातील वृंदावन! दोन्ही अगदी लागून असल्याने खरेतर एक चढायचे आणि दुसरे उतरायचे. कात्रजच्या डोंगररांगेकडे दुरून पाहिले, की ही जोडशिखरे लक्ष वेधून घेतात आणि मग त्या अंदाजानेच कुणालाही ‘कात्रजचा घाट’ दाखवत शाबासकी मिळवता येते. आज ही शिखरे पाहून-अनुभवून घ्या. कदाचित उद्या ही जोडशिखरेही दिसणार नाहीत.
वृंदावन गेले, की गाडी रुळाला लागल्यासारखी वाटते. घाटातल्या गाडय़ांचा आवाज मागे पडतो आणि पक्ष्यांचा किलबिलाट भोवताल जागवू लागतो. एवढा वेळ सिंहगडावर खिळलेली नजरही आता अन्य डोंगर, झाडी, वाटा, तळातील छोटय़ा छोटय़ा गावांकडे जाऊ लागते. या चढउतारावरून मग घसरणे-पडणेही सुरू होते.
एकामागोमाग डोंगर जातात. डावीकडची ससेवाडी, सणसवाडी, उजवीकडचा नवा घाटमार्ग, कोळीवाडी, खंडोबाचा दांड, नांदोशी मागे पडते आणि वाट एका मोठय़ा खिंडीत उतरते - सीताबाईची खिंड! जणू डोंगरातला चौफुला! इथून एक वाट डावीकडच्या आर्वी गावात, तर उजवीकडची डोणज्यात उतरते. या खिंडीत असलेल्या देवाला नमस्कार करायचा आणि पाण्याचे चार घोट घशाखाली उतरवत पुढच्या मुक्तुंग डोंगरावर चढाई करायची. हा चढ चढून वर आलो, की भणाणणाऱ्या वाऱ्याशी झटा देत एक एकुटवाणे झाड उभे
असलेले दिसते आणि मग या डोंगराला मुक्तुंग नाव ठेवणाऱ्याचे कौतुक वाटले. उत्तुंगावरचे हे मुक्त जीवन ते शिखर आणि त्यावरचे ते झाड जगत होते. त्यांचा हेवा वाटत होता. आत्तापर्यंत अर्धी वाट सरलेली असते आणि हिरव्या झाडीतील भरल्या अंगाचा सिंहगडही आता नजरेत आलेला असतो. त्याला खेटून असलेल्या चिलीमखडा ऊर्फ पोटॅटो पॉइंटही आता उठून दिसायला लागतो. या झाडीतच कधीकधी ससे, साळिंदर, भेकर आणि कोल्हय़ांच्या गाठीभेटी घडतात. काहींनी शपथेवर बिबटय़ा दिसल्याचेही सांगितले आहे.
पक्ष्यांसाठी तर हा परिसर स्वर्गीयच! छोटय़ाशा शिंजीरपासून ते धनेशपर्यंत आणि खंडय़ापासून ते मोरांपर्यंत अनेक पक्षिगण इथे सुखनैव नांदतात. सोनकी, तेरडा, चवर, कचोरा, भारंगी अशी नाना फुलेही इथे उमलतात. दर सात वर्षांनी फुलणाऱ्या कारवीचे पाय तर इथे घट्ट रोवलेले आहेत. असे हे वनसौंदर्य या वाटेवरच अनुभवता येते. तासाभराची ही जंगलवाट तुडवल्यावर आपण कल्याण-कोंढणपूरला उतरणाऱ्या रस्त्याजवळ सिंहगडच्या घाटवाटेला येऊन मिळतो.
डझनाहून अधिक डोंगर-टेकडय़ा, तेवढय़ाच खिंडी तुडवत जवळपास पाच-सहा तासांची भटकंती झालेली असते.
शरीराची क्षमता किती आहे, याची परीक्षा घ्यायची असल्यास या ट्रेकसारखा
दुसरा ट्रेक नाही. काही टेकड्या कमी उंचीच्या आहेत, तर काही बऱ्याच उंच आहेत.
चढताना दम लागतोच लागतो, पण टेकडीवर असल्यामुळे थंडगार वारा अंगावरून गेला की थकवा
पळून जातो. उतरताना पूर्ण घसारा आहे. ट्रेक शूज असूनसुद्धा पाय घसरतो. त्यामुळे
खाली उतरताना खूप सांभाळून उतरावं लागतं. आधीच मला ‘उतरताना पाय घसरेल’, असा
फोबिया आहे. इथे तर प्रत्येक टेकडी उतरताना भरपूर घसारा असल्यामुळे मी चक्क खाली
बसून घसरून येत होते. पूर्ण ट्रेक मी असच खाली उतरताना घसरूनच खाली आले. खरतर मला
खूप वाईट वाटत होतं, की मला उभं राहून चालत उतरता येत नव्हतं. कारण घसरण्याची भीती
खूप वाटत होती. पण इलाज नव्हता. ट्रेक तर पूर्ण करायचा होता, मग घसरून तर घसरून. मला
उतरताना पूर्ण मदत मिळाली, ती म्हणजे लीडर सर्वेशची. त्याने शेवटपर्यंत उतरताना
मला हात धरून मदत केली.
रात्री १० वाजता सुरू केलेला, १५ टेकड्या पार करून, मध्येच थांबत, दम
खात, तहान लागली की पाणी पीत, अंदाजे १६ किमी. अंतर पार करून शेवटी माझा कात्रज ते
सिंहगड ट्रेक सकाळी ८ वाजता पूर्ण झाला आणि मी सिंहगडाच्या वरती असलेल्या टेकडीवर
पोहोचले. रात्री ठरवले होते की सिंहगडपण पहायचा, पण ट्रेक २ तास उशिरा पूर्ण
झाल्यामुळे सिंहगड पाहणं झालं नाही. नेहमीसारखंच काहीतरी अपूर्ण राहीलं, पण ट्रेक
पूर्ण झाल्याचं समाधान खूप मोठं होतं.
ट्रेक संपल्यावर तिथेच वरती एक चहाची टपरी आहे, तिथे मी २ कप चहा
प्यायला. चहा पिऊन खूप फ्रेश वाटलं. थोडा वेळ तिथेच बसून मग मी आणि तिथे असलेले
४-५ जण तिथल्या सिंहगड बस स्टँडपर्यंत घेऊन जाणाऱ्या मोठ्या गाडीत बसून
स्टँडजवळच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. तिथे आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि मग पुणे
जाणारी बस पकडली. अशा प्रकारे आमचा ट्रेक संपन्न झाला.
शरीराबरोबरच मानसिक क्षमतेचीही परीक्षा घेणारा, थकवणारा आणि तितकाच
आनंद देणारा, ट्रेक सुरू करण्यापूर्वी ‘आपण हा ट्रेक पूर्ण करू शकू?’ असा स्वतःवरच
अविश्वास वाटायला लावणारा आणि ट्रेक पूर्ण झाल्यावर ‘आपण ट्रेक पूर्ण केला?’ असं
स्वतःचच आश्चर्य वाटायला लावणारा, असा हा –
के२एस!
पुन्हा भेटूया
अशाच एका साहसी वळणावर
तोपर्यंत
अलविदा!
पुन्हा भेटूच
अशाच एका साहसी वळणावर
तोपर्यंत
अलविदा!
No comments:
Post a Comment