Tuesday, 15 May 2018

कास पठार – ठोसेघर धबधबा - किल्ले सज्जनगड! Kaas Plateau - Thoseghar Waterfall - Fort Sajjangad!

कास पठार - ठोसेघर धबधबा 
kAAS  pLATEAU 
tHOSEGHAR  wATERFALL


ठिकाण – कास पठार – सातारा – महाराष्ट्र – भारत
क्षेत्रफळ – १० चौ. किमी. (३.९ चौ. मैल)
प्रकार – पठार
जवळचे गाव – सातारा
जागतिक वारसा – २०१२


जिथे वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या आकाराची फुले फुलतात; नैसर्गिक सौंदर्याने नटलेले, निसर्गाचा अद्भुत चमत्कार जिथे पाहायला मिळतो. असे साताऱ्याचे जागतिक वारसा लाभलेले पठार  म्हणजेच –
कास पठार!
हे पठार पाहण्याची इच्छा बऱ्याच वर्षापासून होती, ती संधी आता चालून आली होती. दरवर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात कास पाहायला वेगवेगळे ग्रुप्स जातात. मी ट्रेकिंग करत असल्यामुळे बरेच ट्रेक ग्रुप्स माहित होते. त्यातलाच एक ग्रुप म्हणजे ‘एक्सप्लोरर्स’. त्यांची दरवर्षी कासला एक दिवसाची ट्रीप जाते, हे माहित होतं. यावेळेस पण त्यांची ट्रीप जाणार आहे, हे कळलं. मग यावेळेस जायचंच असं ठरवलं. एक्सप्लोरर्सला फोन करून ट्रीपचे डीटेल्स विचारले. मी लगेचच माझे आणि माझी बहिण
शिल्पाचे ट्रीपचे पैसे ऑनलाईन भरून टाकले. ट्रीपचा प्लॅन मस्तच होता –
माझ्या ट्रेक मोहिमेतला सातवा ट्रेक!
कास पठार – ठोसेघर धबधबा – किल्ले सज्जनगड!
१७ सप्टेंबर २०१७ रविवार.
रविवारी सकाळी पुण्याच्या एस.पी. (सदाशिवरावभाऊ पटवर्धन) कॉलेजच्या समोर पिक अप पॉइंट होता. मी आणि शिल्पा सकाळी ६ पर्यंत एस.पी. समोर पोहोचलो. एक्सप्लोरर्सच्या लीडरला फोन लावला आणि सांगितलं, की “आम्ही पिक अप पॉइंटला येऊन थांबलो आहोत.” लीडर म्हणाली, “तिथेच थांबा, आम्ही येतच आहोत.” त्या दिवशी पुणे-सातारा सायकल मॅरेथॉन होती. एस.पी. कॉलेजमधूनच मॅरेथॉन सुरु होणार होती. आम्ही दोघी तिथेच समोर उभं राहून सायकलस्वारांची मॅरेथॉन तयारी पाहत होतो. ती पाहून आम्हाला वाटत होतं, आपणही सामील व्हावं. एक्सप्लोरर्सच्या लीडरला यायला ७ वाजले. लगेचच ट्रीपची बसही आली. आम्ही दोघी बसमध्ये जाऊन बसलो. आम्ही सगळे मिळून ३३ जण होतो. आम्हा दोघींचा सीट नंबर ३१-३२ होता, कारण आम्ही सीट बुक करायला उशीर झाला होता. या कास ट्रीपसाठी ‘First call first’ अशी पद्धत असल्यामुळे आमच्या आधी ज्यांनी फोन करून सीट बुक केली, त्याप्रमाणे सीट नंबर दिले गेले होते. त्यामुळे आमची एकदम शेवटची सीट होती. ट्रीप ग्रुपमध्ये फक्त १० सोडले, तर बाकी सर्व वरिष्ठ नागरिक होते. त्यांचा उत्साह आमच्याप्रमाणेच भरात होता. वयाने जरी ते वयस्कर असले तरी मनाने तरुण दिसत होते. तेवढ्यात लीडरने “मॅरेथॉनमुळे पुढे रस्ता ब्लॉक असल्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो”, असे सांगितले. मॅरेथॉन सायकलस्वार एस.पी. मधून ७.३० वाजता निघाले आणि आमची बस पण त्याच्यामागे कासला निघाली. आमची ट्रीप एकदाची सुरु झाली.
सातारला पोहोचायला अंदाजे ०२.३० तास लागतील, असे लीडरने सांगितले. बस सुरु होताच थोड्या अंतरावर पोहोचताच थंडगार हवा खात मला नेहमीप्रमाणे झोप लागली. शिल्पाला पण झोप लागली. अचानक गरम व्हायला का लागलं? म्हणून जाग आली तर बस थांबली होती. बाहेर पाहिलं, तर मॅरेथॉनमुळे पुढे रस्ता ब्लॉक झाल्यामुळे बस थांबली, असं कळलं. जवळजवळ १ तासभर आमची बस कासपासून थोड्याच अंतरावर थांबली होती. सगळ्यांना कंटाळा आलेला चेहऱ्यावर दिसत होतं. गर्मी खूप जाणवत होती आणि पावसाचा अंशही नव्हता.  तासानंतर रस्ता मोकळा झाला आणि आमची बस सुसाट वेगाने कासकडे निघाली. आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अर्ध्या तासात एकदाची आमची बस कासला पोहोचली. बसमधून खाली उतरल्यावर समोरच प्रचंड असे कास पठार दिसले आणि मघाशी आलेला सगळा क्षीण कुठल्याकुठे पळून गेला.
जिकडे पाहावे तिकडे फुलं, फुलांची चादरच म्हणा ना! कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणः २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे.[२] या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात. कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे. कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. ते सज्जनगड किल्ला आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे. कास तलावाच्या दक्षिणेला ३० किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे. तलावाच्या जवळच वजराई धबधबा आहे. हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे. या तलावात बसायला दगड आहेत. आम्ही दोघींनी दगडावर बसून फोटो काढले. मी फोटो काढताना ज्या दगडावर बसले होते, तिथे शेजारी पाण्यात खेकडा होता, अगदी माझ्या पायाजवळ. पण मी थोडी हालचाल केल्यामुळे तो पटकन पाण्यात गेला.
वेगवेगळ्या तर्हेची फुलं पहिली. त्यात सोनकी, सीतेची आसवे, टोपली कारली, वक्रतुंड, पांढरा गेंदा, तेरडा, रानवांग, रान हळद; ही व अशी अनेक फुलं पाहायला मिळाली. हे सगळं पाहून कासला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत २०१३ साली समाविष्ठ केलं आहे, याचे कौतुक वाटते. मी आणि शिल्पाने भरपूर फोटो काढले. बाकी ट्रीपमेट्स पण खूप फोटो काढून आनंद घेत होते. कास पठार पाहून आमची बस ठोसेघर धबधब्याकडे निघाली. तब्बल १ तासाचा पूर्ण घाटातला रस्ता लागतो कास आणि ठोसेघरमध्ये. मार्गात सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसत होत्या. ते सौंदर्य मी डोळ्यात साठवून घेत होते. मधल्या मार्गात पवनचक्क्यापण दिसल्या. पाऊस पडत असता, तर या सौंदर्यात अधिक भर पडली असती. त्या दिवशी पावसाने कुठे दडी मारली होती कुणास ठाऊक. बघता-बघता आम्ही ठोसेघर धबधब्याकडे पोहोचलो. प्रत्यक्ष धबधब्यापर्यंत पोहोचायला साध्या आणि सोप्या पायऱ्या आहेत. सज्जनगडापासून १३ किमी अंतरावर ठोसेघरचा धबधबा आहे.सह्याद्रीच्या डोंगर रांगाप्रमाणे ठोसेघरला देखील धबधब्यांच्या रांगा आहेत. त्यातील एका धबधब्याची उंची साधारणपणे २०० मीटर आहे. पावसाळ्यात पर्यटकांची इथे खूप गर्दी असते.कस्पठार हे अत्यंत सुंदर फुले पाहायला मिळतात.इथे फुलांच्या संवर्धनासाठी कडक नियम आहेत.त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते.निसर्गाचा सुंदर देखावा इथे पहावयाला मिळतो. धबधब्यासोबत आम्ही फोटो काढले, यासोबत धबधब्याचा व्हिडियोपण काढला. इतका उंच आणि सुंदर धबधबा पाहून मन प्रसन्न झालं होतं. धबधबा पाहून आम्ही पुढे सज्जनगड पाहायला निघालो.

फुलांच्या सौंदर्याने नटलेले – कास पठार आणि
डोळ्यांना दिपवणारा टोलेजंग धबधबा – ठोसेघर
पाहून मन आनंदाने भरून पावलं.  

पुन्हा भेटूया
अशाच एका साहसी वळणावर
तोपर्यंत
अलविदा!
























































किल्ले सज्जनगड
fORT  sAJJANGAD


ठिकाण – गजवाडी – सातारा – महाराष्ट्र – भारत
उंची – १०२१ मी. (३३५० फूट)
डोंगररांग – सातारा (पश्चिम घाट)
प्रकार – गिरिदुर्ग
जवळचे गाव – कारी, परळी, गजवाडी 
बांधकाम – श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज


कास-ठोसेघर ट्रीपमध्येच सज्जनगडचा पण प्लॅन होता. आधीच कासला पोहोचायला उशीर झाल्यामुळे सज्जनगडला जायचं ठरत नव्हतं. मग आम्ही सगळे ट्रीपमेट्स म्हणालो, “इथे आलोच आहोत, तर सज्जनगड पाहूनच जाऊया.” कारण ठोसेघरपासून सज्जनगड जास्त लांब नव्हता. आमचा सगळ्यांचा उत्साह पाहून लीडरने सज्जनगडला जायचं पक्कं केलं. आम्ही सगळे खुश!
माझ्या ट्रेक मोहिमेतला सहावा गड!
किल्ले सज्जनगड!
१७ सप्टेंबर २०१७ रविवार.
गड चढायला अगदीच सोप्पा आहे. गाडी अगदी पायथ्यापर्यंत जाते आणि तिथून गडापर्यंत फक्त पायऱ्या.
आश्वलायन ऋषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्वलायनगडअस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवरसताराअशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत. परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधीव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या नैर्‌ऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे.
हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंच आहेतर पठारापासून १००० फूट उंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ १ कि.मी हून अधिक आहे. पश्चिमेस खेड-चिपळूणउत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगडदक्षिणेकडे कळंबईशान्येस सातारा शहर व अजिंक्यतारा आहे.
या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. २ एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगङ झाले. पुढे राज्याभिषेकानंतर १६७९, पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.
१८ जानेवारी १६८२ रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. या नंतर पुढे २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे 'नवरससातारा' म्हणून नामकरण झाले. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थशिष्य कल्याण स्वामी यांचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या  दरवाजात श्रीधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामदासांना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती. अंगलाई मंदिर समर्थांनी बांधले. शके १६०३ माघ नवमी (सन १६८२) रोजी रामदासांनी समाधी घेतली. म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले. राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात रामलक्ष्मणसीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे. भुयारात समर्थांचे समाधिस्थान आहे. समाधीमागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत. मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे. दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे. मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई हिचे वृंदावन आहे. माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी साजरी करतात.
·       गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला 'छत्रपती शिवाजी महाराजद्वारअसे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे.
·       दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला 'समर्थद्वारअसेही म्हणतात.
आजही हे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो. त्याचा मराठी अर्थ खालील प्रमाणे :
१.  ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे.
२.  हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे.
३.  तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहेस.
४.  तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात.
५.  परळी किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जनादिलाखर या तारखेस तयार झाला. आदिलशहा रेहान याने काम केले.
ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळावे. समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशीदवजा इमारत आहेतर समोरच आंगलाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली.
गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर. समर्थ रामदासांच्या निर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले.
मंदिरालगतच अशोकवनवेणाबाईचे वृंदावनओवऱ्याअक्काबाइचे वृंदावन आणि समर्थांचा मठ या वास्तू आहेत. जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. त्यामधे पितळी खुरांचा पलंगतंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्रसमर्थांची कुबडीगुप्तीदंडासोटापाण्याचे दोन मोठे हंडेपाणी पिण्याचा मोठा तांब्यापिकदाणीबदामी आकाराचा पानाचा डबावल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. या गुप्तीमध्ये एक लांबच लांब धारदार तलवार आहे.
राममंदिर व मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाज्याने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे. त्यास ब्रम्हपिसा म्हणतात.
गडाच्या पश्चिम टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात.
गडाच्या उत्तरेस बाटेवरच गायमारुती व कल्याण स्वामी मंदिर आहे. गायमारुती देवळाजवळून कड्याच्या कडेकडेने एक पायवाट जातेसाधारणत: १०० मीटर अंतरावर एक गुहा आहे. त्याला रामघळ म्हणतात.
सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे.
कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय़ आहे
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यांपैकी एक गाडीमार्ग आहे.
·       परळी पासून : सातारा ते परळी अंतर १० की.मी.चे आहे. परळी हे पायथ्याचे गाव. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण १८० पायऱ्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो.
·       गजवाडी पासून : सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ किलोमीटरवर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे १०० पायऱ्यांनंतर दरवाजा लागतो. रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरतात.
एस.टी. महामंडळाच्या बसने साताऱ्याहून जाता येते. सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे. कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय़ आहे.
गडावर राहण्यासाठी खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळादेखील आहेत. सज्जनगड खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात. सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे.

कास-ठोसेघर ट्रीपमध्ये सुंदर असा सज्जनगड नाही पहिला. तर ट्रीप अपूर्ण राहते. असा आहे –
किल्ले सज्जनगड!

पुन्हा भेटूया
अशाच एका साहसी वळणावर
तोपर्यंत
अलविदा!





















No comments:

Post a Comment